पालघर जिल्हाधिकारी कार्यालय तर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन - Vasai live Marathi news
📢 यह टेक्स्ट केवल Admin द्वारा संपादित किया जा सकता है।
📢 Breaking News: यहाँ Admin जो चाहे लिख सकता है — बाकी कोई नहीं बदल सकता।
📢 यहाँ पर अपना मैसेज लिखें — Breaking News, Event, या Announcement!
🔄 ताज़ा खबरें लोड हो रही हैं...
🔴 Vasai Live News - अब सच्‍ची खबरें मिलेंगी आपकी अपनी वेबसाइट और YouTube चैनल पर! जुड़े रहिए सच्चाई के साथ! 🔴
✨ वसई लाईव्ह न्यूज संपर्क क्रमांक 9890188174✨

Thursday, 11 September 2025

पालघर जिल्हाधिकारी कार्यालय तर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन


 *“श्री गणेशा आरोग्याचा” मोहिमेअंतर्गत* *मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय तर्फे आरोग्य शिबिरांचे आयोजन*


पालघर:11 सप्टेंबर : पालघर जिल्ह्यात मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय पालघर यांच्यातर्फे “श्री गणेशा आरोग्याचा” या विशेष आरोग्य मोहिमेअंतर्गत एकूण 342 आरोग्य शिबिरे यशस्वीपणे आयोजित करण्यात आली. सदर मोहिमेचा उद्देश ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना सहज व मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे तसेच आरोग्याबाबत जनजागृती करणे हा होता.


या शिबिरांचे तपशील पुढीलप्रमाणे :

एकूण शिबिरे आयोजित – 342

एकूण रुग्णांची तपासणी – 19,913

पुरुष रुग्ण – 8,813

महिला रुग्ण – 6,897

बालरुग्ण – 4,206

रेफर करण्यात आलेले रुग्ण – 215

रक्तदान शिबिरे आयोजित – 04

एकूण रक्त पिशव्या संकलन – 184


विशेष तपासण्या व सेवा :

एक्स-रे तपासणी – 73

ईसीजी तपासणी – 524

सिकल सेल स्क्रिनिंग – 1,474

आयुष्मान भारत कार्ड तयार – 1,089


या उपक्रमातून हजारो नागरिकांना थेट आरोग्यसेवेचा लाभ झाला. गंभीर रुग्णांना आवश्यक तेथे पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले. रक्तदान शिबिरांमधून संकलित झालेल्या रक्तपिशव्यांमुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदायी मदत मिळणार आहे.


सदर मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हा आरोग्य विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्रे, वैद्यकीय अधिकारी, स्वयंसेवी संस्था तसेच स्थानिक नागरिक यांचे सहकार्य लाभले असून मुख्यमंत्री सहायता निधी, पालघर तर्फे सर्व संबंधितांचे मनःपूर्वक आभार मानण्यात येत आहेत.


“सर्व नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्यसेवा पुरविणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असून, अशा उपक्रमांच्या माध्यमातून जिल्हा आरोग्यसेवेचा स्तर अधिक उंचावण्याचा प्रयत्न सतत सुरू राहील.”